Friday, June 28, 2013

आसमंत माझा

मित्रान्नो ,

माझ्या  ब्लॉग पर्यंत पोचण्यासाठी , तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद . मी ना चांगला लेखक ना चांगला वाचक पण कधी कधी इतकं छान छान सुचायला लागतं की ते कागदावर उतरवल्याशिवाय चैनच पडत नाही . आधी डायरी लिहित होतो तेव्हा सगळ त्यात उतरवत असे. कधी कधी तर रात्रभर लिहित बसे . मला अजून पण आठवत , C-DAC ला असतांना , रात्री एक वाजता लिहायला बसलो , इतकं काही  सुचत होत की  पहाटेचे  ५:३० वाजून गेले तरी समजल नाही. शेवटी पक्षांच्या किलबिलाटाने शुध्दीवर आणलं. 

डायरीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मनातिल चांगली-वाईट प्रत्येक गोष्ट तुम्ही express करू शकता आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे तुम्हाला ती secret ठेवावी लागते. मनातल्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याच त्याला पार्यायी माध्यम म्हणजे BLOG. 

मी कधी स्वताचा ब्लॉग लिहील असं वाटलं न्हवत. उलट कशाला हा time pass, कोण वाचणार आपले ब्लॉग म्हणून ब्लॉग लिहिण्याच्या विरुद्धच होतो. मला inspire केल ते एका मुलीने . लग्नासाठी मुलगी शोधता-शोधता मला तिचा ब्लॉग वाचायला मिळाला. उत्सुकता म्हणून सहज एक वाचला छान वाटला म्हणून दुसरा वाचला तो तर पहिल्यापेक्षा चांगला वाटला. अस करत करत सगळे वाचले. जेवढ चेहऱ्याने impress केल नाही त्यापेक्षा जास्त ब्लॉग ने केलं. खूप साधं लिखाण होत पण एक -एक शब्द आपल्या मनातला वाटला . त्यावर वाचकांनच्या  comments मग पुन्हा त्यावर reply , सगळच भारी होत. 

मनाच्या या खुल्या आसमंतात स्वछंदपणे भरारी घेणारा हा ब्लॉग ..... आसमंत माझा



1 comment: